प्रिय आईस, सा.न.वि.वि. पत्र लिहीण्यास कारण कि, शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण लावून धुवायची गरजचं नाही आहे. कारण चंदू आणि पप्याने चाटून पुसून सगळा डब्बा साफ केलाय. यावेळेस करंज्या आणि चकल्या जरा जास्तचं पाठवं. तसंही वस्तीगृहातील आमटीचा किट आलाय. दिवसाआड अळू चं फदफद खाऊन जिव तेवढा बेजार झालाय, बाकी सगळं निवांत आहे. कळावे, तुझा मुलगा अक्षय