सगळंच आपल्या मनाप्रमाणे होत असं काही नाही, परंतू जे जस घडतं जात तस बघायला गेलं तर त्याने आपलं काही वाईट हि होतं नाही... आई, बाबा, नवरा, बायको ह्या जवळच्या नात्यांना दुसरा पर्याय नसावा, म्हणजे परत फिरुन आपल्या माणसांकडे येण सोपं होत. पर्यायी माणसं आधीच जोडलेली असली की मन नव्या माणसांमध्येच कायमचं रमतं. आपली माणसं खुप मागे पडतात, हे कळे पर्यंत ते रक्ताच नात मुळापासून संपत. व्यवसाय म्हटला की चढ उतार येणारचं.... उतार आले म्हणून घाबरून हताश व्हायचं नाही, चढ आल्यावर लगेच हुरळून जायचं नाही, कारणं सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख येतंच...... जे लोक तुमच्यावर जळतात तेचं लोक तुम्हाला टाळतात, जे लोक तुम्हाला मानतात तेचं लोक तुम्हाला जोडून ठेवतात. 🍁मन एक लेखणी... ©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून.... प्रेरणादायी विचार...