पावलांना अंत नाही वेदनांना गाव नाही भावनांना बूड नाही काळजाला ठाव नाही ऊत्साहाला वेस नाही कल्पनेला नाव नाही जाणिवेला घाव नाही औषधाला भाव नाही प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज नवीन काहीतरी आणलयं मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे. उदाहरण=पावलांना अंत नाही वेदनांना गाव नाही अशाप्रकारे आता समोरची ओळ सुद्धा नाही नेच संपवायची आहे आणि याप्रकारे कविता किंवा चारोळी बनवायची आहे. जमेल ना? एकदा नक्की करुन बघा.