मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून . अगोदर महिन्यातून एकदा तरी भेटणारे व चहा कॉफी घेणारे ते दोघे आपापल्या कामात इतके गुंतून गेले होते कि अर्धा एक तास एकमेकांसाठी काढू शकले नव्हते. मुलांच्या परीक्षा, सासूचे आजारपण, स्वतःची प्रकृती, नवर्याचा मूड सांभाळता सांभाळता या ‘मनाच्या कप्प्याला’ ती न्याय देवू शकली नव्हती .आणि याची जाणीव तिला ‘काय गं....मला भेटायलाही तुला वेळ मिळत नाही अलीकडे. तब्बल दीड वर