'महात्मा फुले आणि बळीराजा' बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या कथेविषयीचं, आपलं आकलन मात्र वाढलं नाही, असंच खेदाने म्हणावं लागतं. वर्षानुवर्ष तीच कथा आपण सांगत आलो किंवा ऐकत आलो. त्यात काडीचाही बदल नाही. एवढी वैचारिक स्थितीप्रियता, आमच्या अंगी आली आहे. विचारच करायचा नाही असा प्रण केल्यावर, वय वाढलं तरी बुद्धीत वाढ कशी होणार! परिणामी हजारवेळा ऐकूनही त्या कथेतल्या विसंगती, आपल्याला कळल्या नाहीत.