आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघाती मृत्यूच्या बातम्या तशा रोजच येतात. परंतु पावसाळा सुरू झाला आणि या बातम्या वाढल्या. सुरतला विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू पावलेल्या तरुणीची क्लीप वारंवार पाहायला मिळाली, पुण्यात संरक्षक भिंत कोसळून 15 मजुर गाडले गेल्याची बातमी कानावर आली, नक्की संख्या देव जाणे. अजून किती बळी जाणार आहेत? श्रध्दांजली शब्द बोथट झालाय आता.. किती वेळा आणि कुणाकुणाला द्यावी? ...शैलेश हिंदळेकर