आज उद्या करता करता दिवस निघून जातात, एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात. होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो, मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो. सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो, शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो. निघून जाते जेव्हा ही वेळ तेव्हा मग समजून येते, कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai