गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे. संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा. आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले, रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले. पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा, किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे. आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात, शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून, उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात. पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा, गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे. पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात. पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती, सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती. आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते. शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा, पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा. आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही. पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही. पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही. गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आमचं गाव. गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे. संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा. आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले, रात्रभर पत्ते खेळायला नि गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले. पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात दोन दिवसाची मजा असायची,