स्वातंत्र्य ते नव्हे जे आज आपण जगतोय, मनमानी करत मनात येईल तसे वागतोय. दिले ज्यांनी बलिदान स्वातंत्र्यासाठी त्यांना मात्र विसरतोय, आणि नेहमीच्या सुट्टीत अजून एक सुट्टीची भर म्हणून कुठेही फिरायला जातोय. तसे पाहता आपण अजूनही गुलामगिरीच्याच विळख्यात आहोत, इंग्रजांकडून सुटलोय पण आपल्यातच अडकून आहोत. खरे स्वातंत्र्य कशाला म्हणावे ? तर मनापासून याद करावे स्वातंत्र्यवीरांना आणि त्यांचे बलिदान आठवावे. अडकलोय अजूनही ज्या जातीपातीच्या विळख्यात त्यातून मुक्त व्हावे, सर्वधर्मसमभाव जाणुनी आपण सर्व एकच आहोत असे समजुनी राहावे. स्वातंत्र्य हे फक्त एक नाव आहे जे स्वतः गुलाम आहे, इथे प्रत्येक स्वातंत्र्य लहान व्यक्ती हा मोठ्या व्यक्तीच्या दबावाखाली आहे. खरे स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा हा फरक निघून जाईल, कुठलाही भेदभाव नसताना सर्व समसमान आहे हे समजले जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai