कित्येकदा जाणूनबुजून मनाच्या हाकेला साद घालणे टाळते . असंख्य प्रश्नांना डावलते. भावनारूपी मनात भावनांचे तोरण सजलेले असते. अगदी निरागस भावना असतात. तरी बुध्दीच्या अधिराज्य पुढे निरागस भावना पूर्णत्वास नेणे कठीण असते . अगणित मौल्यवान भावनां पासून खोटे बहाने शोधून पळ काढतो .पळ काढला तरी... मनाच्या तळाशी भावनांची साठवण असते. अवचित पणे कधी मनाचा तळ गाठला जाईल. याचा काही नेम नसतो. एकांतात आठवणीं संघे दमछाक झाली की... डावललेल्या भावना आणि आठवणी नयनांतुन अलगदपणे आसवांच्या रूपाने ओघळतात. तरी देखील मनाला मागे सोडून बुध्दीच्या मागे धावणारे आम्ही...... सरतेशेवटी ओंजळीत तडजोड घेऊन आयुष्य काटतो!!! मनातील भावना