"जय किसान " माझ्या महाराष्ट्राचा माझ्या देशाचा शेतकरी वर्गाचा प्रवास आटवडी बाजार, तेल मीट आणण्यासाटी वीस. तीस किलोचे धान्य घेऊन आपला संसार, प्रपंच चालवणारा माझा शेतकरी.. अंगात ठिगळ लावलेला सदरा फाटका शिवलेला धोतर, अथवा विजार, डोळ्या भोवती चन्द्र आकार सुरकुत्या पडलेलं विचाराने मग्न झालेला माझा शेतकरी त्याला ना सातवा आयोग, ना आटवडी सुटी, ना सण, पब्लिक हॉलिडे रोजचा दिवस सारखा संप करता येत नाही ना मोर्च्या, काम बंद करता येत नाही आंदोलन कोणाजवळ मांडायची माझ्या शेतकरीची व्यथा रातीची लाईट आटो स्टार्ट मोटार लाहून उसाच्या सरीत एकादी डुलकी घेतो आणि जेव्हा पाणी पायाला लागतो लगेच जागी होहून रातभर दारं धरतो अंधार ना वारं, काटे भय, ऊन, पाऊस कशाचीच पर्वा न करता आपल्या मेहनतीने संकंटांना झुंझ देत असतो, कितीही सगे, सोयरे घरी आल्यावर गोड धोड खऊनच पाठवतो कधीच कर्जाला घाबरत नाही कोणी वापरलेला सदरा दिला तर तो घेणार नाही कारण त्याला एक दिवसाचा शोभनीय दिसायचा नाही त्याला तो सदरा टोचेल... रोजच्या सद्रीचीमातीची कष्टचि सुंगंध येणार नाही आणि शांत झोप लागणार नाही. माझा शेतकरी मनाने खूप श्रीमंत आहे तो जगतो आणि दुसऱ्याला जगवतो. असा माझा महान किसान आहे. आपला नोकर वर्गाला सुट्टी नाही की, D.A., नाही की, पेन्शन नाही की, पगार वाड नाही कि,,, अशा अनेक कारणांनी.. आंदोलने, संप मोर्चा चक्का जॅम, रेल रोको, दगड फेक संघटना सरकारी माल मतेची नुकसान सारा बोंबाबोम अशा विचित्र परिस्तितीत माझा शेतकरी कसा जगायचा, व्यापारी चा छळ, मजुराचा छळ नोकर वर्गाचा छळ शासनाचा छळ.... प्रत्येक शासकीय वर्गात लाच कोर कर्म चारी, अधीकारी.. आमच्या हातात पैसा कसा टिकायचं माझा शेतकरी गाव तालुका ज़िल्हा सोडुन कासमीर कन्याकुमारी, उटी मैसूर, सागर नदी, निसर्ग डोंगर पक्षी, तीर्थ.... कधी पाहायला मिळेल कधी दिवस बदलतील कब अच्या दिन आयेंगे... कब कृषी प्रधान, जय किसान देश बनेगा.... ...........बदल काळाची गरज आहे....... प्रगतीची दिशा आहे.... ........जय किसान .........जय महाराष्ट्र ..........जय भारत ... राहुल सोनटक्के शेतकरी परिश्रमाची भाकर (माझा बळीराजा )