तू मुक्त आहेस.... भावनांचं गाठोडं घेऊन जातांना कधी थकली तर विसावा घे त्या आठवणींच्या झुल्यावर बघ मन शांत होईल.... दुरावलेल्या वाटा शोधतांना होतेच दमछाक तर कधी येतं नैराश्य तेंव्हा तो अस्ताला गेलेला सूर्य बघ उद्या उगवण्यासाठी बुडालेला क्षणात दूर होईल ते मळभ अन पेटशील तू नव्याने त्या निरागस पण संपण्यासाठी पेटलेल्या दिव्यासारखं... सुखाला शोधावं वाटलंच कधी तर तो नभात हरवलेला चंद्र बघ म्हणजे तुला तुझ्या दुःखाची खंत वाटणार नाही .... तू मुक्त आहेस त्या हरणी सारखी चपळ अन चाणाक्ष सुद्धा तेंव्हा विसावा घेऊन उठली ना तर उधळू दे तुझ्या भावनांचे वारू चौफेर अन घुमूदे तो जल्लोष जो तुला बंधनात ठेऊ पाहत होता.... वैभव धर्माधिकारी